बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदवरून मनसेनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला आहे. बंद हा सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे.
बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंद पाळला जात आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. सांगली, धुळे या ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले आहे. तर मुंबईत कांजुरमार्ग स्थानकात रेलरोको करण्यात आला होता. काही ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळत आहे. या बंदवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसेनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्यातील बंद हे सरकार पुरस्कृत आहे. राज्य सरकारच बंद पुकारत आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. भारत बंदबाबत नेमकं तेच घडत आहे, असंही ते म्हणाले.
बंद हा सरकार पुरस्कृत; मनसेचा आरोप.